सर्वसाक्षी, आपला हिशोब बरोबर वाटतो, मात्र शंकानिरसनासाठी ही बातमी देणाऱ्या "विद्वान" पत्रकाराला त्याने कशाच्या आधारावर हे आकडे छापले हे विचारून बघा... त्याने जर तुम्हाला हिशोब सांगितला, तर तुम्हाला त्याच्याशी मुद्द्यावर चर्चा करता येईल. जरी त्याने तुमच्याकडे दुर्लक्ष केलं तरी निदान त्याला आणि म.टा. ला हे कळेल की त्यांचे ग्राहक जागरूक होत आहेत.
TOI च्या बाबतीत पण जर तुम्हाला त्यांनी छापलेल्या गोष्टी नाही आवडल्या तर त्यांना सांगा की का नाही आवडल्या... जर त्यांनी दुर्लक्ष केलं तर त्याचं वृत्तपत्र घेणं बंद करा आणि संपादकांना कळवा की तुम्ही नाराज आहात आणि तुम्ही दुसरं वृत्तपत्र घ्यायला लागला आहात... अशी १००० पत्र त्यांना आली तर ते निश्चितच बदल करतील
बाजाराधीन अर्थव्यवस्थेत (market economy) ग्राहकांच वागणं/मागणी आणि क्षमता हे उत्पादनांचा दर्जा आणि किंमत ठरवतात... स्पर्धा आहे आणि तुम्हाला इतर पर्याय आहेत हे जर उत्पादकांना तुम्ही दाखवलंत, तर स्पर्धेत टिकण्यासाठी त्यांना निश्चितच तुमच्या गरजा/अपेक्षांचा विचार करावा लागेल.