काही काही वेळा एकाच विचारावर दोन वेगळे लेखक / कवी साधारण एकाच काळात आपले विचार मांडतात.

हो. पण प्रत्येकाची लकब, शैली वेगळी असायला हवी. एकाच विचारावर अनेक लेखक एकाच वेळी असंख्य गोष्टी लिहीत असतात.  प्रत्येक लेखकाचे नाविन्य  (नॉवेल्टी फीचर्ज**)  बघायला हवे. दिसायले हवे.

काही वेळा एका लेखकाच्या विचारावरून स्फूर्ती घेऊन दुसरा लेखक त्याचा अधिक विस्तार करतो.

विस्तार म्हणजे उचलेगिरी नाही. पण अश्यावेळी दुसऱ्या लेखकाने मूळ प्रेरणास्रोत उघड केल्यास उत्तम.

चित्तरंजन भट

** पेटंट तपासताना पेटंट तपासनीस पेटंट अर्जातली नाविन्ये बघतो. ही तपासणी करताना 'मला असे का सुचले नाही!" असे त्याला प्रकर्षाने वाटायला हवे, असे म्हणतात. तोच निकष कमी अधिक प्रमाणात इथेही लावता येईल.