आपल्या प्रतिसादातील क्रमाप्रमाणे खाली माझी मतं देतो -

१- कोणत्याही शास्त्रात अमुक एक गोष्ट्झाली की त्याला तमुक प्रतिक्रिया मिळालीच पाहिजे असे होत नाही. 

म्हणजे शास्त्रज्ञांनीही दैवावर अवलंबून रहायचं का?  हे कसं शक्य आहे?  अणूचं विघटन होताना प्रत्येक वळेसच स्फोट होतो.  कधी कधी होतो आणि कधी कधी नाही असं होतं का?  हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या संयोगातूनच पाणी तयार होतं.  त्यातून कधी कधी पाणी आणि कधी कधी दुसरंच काही द्रव्य तयार होतं ?  तुम्ही दिलेल्या उदाहरणातही सर्व निकष जर सारखेच असतील (म्हणजे दोघांनी खाल्लेला पदार्थ सारखाच असेल, सारख्याच प्रमाणात खाल्ला असेल, दोघांची शारीरिक स्थिती सारखीच असेल,  दोघांची रोगप्रतिकारकशक्ती सारखीच असेल, वगैरे वगैरे) तर दोघांनाही होणारा त्रास सारखाच असेल.  असं नसतं तर वैद्यकीय शास्त्र उभंच राहू शकलं नसतं.

एकाच घटकाचा विचार करून निष्कर्ष काढायचा प्रयत्न केलात तोही त्या घटकाचे इतर घटकांवरील अवलंबित्व लक्षात न घेता तर कसे चालेल?

हे मान्य.  माझ्या आधीच्या प्रतिसादातही मी म्हटलं होतं की मी फक्त नक्षत्र / वाहनं या एकाच घटकाबद्दल बोलत आहे कारण ही चर्चाच त्या घटकाबद्दल आहे.  मी आधी म्हटल्याप्रमाणे इतर सर्व घटकांचा वेगळा विचार करता येइल.  पण नक्षत्र / वाहनं या घटकाला शास्त्राधार काही नाही.

२- नक्षत्राचं अमूक वाहन का?-......  अजिबात पाऊस न पडणारी, थोडा पाऊस, आणखी थोडा, भरपूर... व हे सर्व खोलात शिरावे न लागताही लक्षात रहावे म्हणून वापरलेली वाहनांची प्रतीके.  - ठीक, मान्य.  

३ - बाय द वे, आधुनिक यंत्रणेद्वारे केल्या जाणाऱ्या भाकितांची अचूकता किती असते हे कोणी सांगेल का?

आजपर्यंत उपग्रहाने घेतलेल्या फोटोंवरून येणाऱ्या वादळांची / तुफानी पावसाची पूर्व-सूचना मिळाल्यामुळे वाचलेल्या अपरिमीत  नुकसानांची शेकदो उदाहरणं देता येतील.  ग्रह, नक्षत्रं, वाहनं यांवरून अशी पूर्व सुचना मिळून वाचलेल्या नुकसानाचं एकही उदाहारण माझा ऐकीवात नाही.  दुसरं भारतात हवामान शास्त्र अजूनही पूर्ण प्रगत झालेलं नाही याचा अर्थ आधुनिक तंत्रज्ञानच विश्वासार्ह नाही असा निष्कर्ष काढता येत नाही.  तिसरी गोष्ट म्हणजे आधुनिक यंत्रणा विश्वासार्ह नाही असं जरी गृहित धरलं तरी ते वाहनांच्या विश्वासार्हतेचं कारण (justification) होऊ शकत नाही.

४- .........त्यात जमिनीचे प्रकार, वीजेचे प्रकार वगैरे 'वैज्ञानिक' घटक दिसले की ते मूळ शास्त्रातले नसून त्यात नंतर घातलेली भर असते. अर्थातच असे नाहीये...........इतकेही न कळण्याइतके आपले पूर्वज मूर्ख होते असे का वाटते, कळत नाही.

माझ्या आधीच्या प्रतिसादातही मी म्हटलं होतं की  जमिनीचे प्रकार, वीजेचे प्रकार वगैरे घटकांना शास्त्रीय आधार आहे आणि म्हणून त्यांचा विचार वेगळा करता येईल.  आपल्या पूर्वजांना हे कळत नव्हतं वगैरे मी म्हटलेलं नाहीये.  कुठल्या एखाद्या विधानाचा तसा अर्थ होत असल्यास क्षमस्व.

५- विज्ञान म्हणजे नक्की काय?- .......  ते तर्कशुद्ध असेलच असे नाही.

असं म्हटल्यावर प्रश्नच मिटला.