मुंबई, पुण्याची लोकसंख्या  खूप आहे. तेथे लोकांना स्वतःकडे बघायला वेळ नसतो. जो तो नुसता पळत असतो. 

(परदेशात कित्येकवेळ औषधाला सुध्दा माणसे मिळत नाहीत. त्याचे काय?)

दुसरे असे,  जे निकष लावले, की रस्त्यात पडलेले कागद, दुकानदाराने आभार मानने, उघडलेले दार धरुन ठेवणे. यावर शहराचे उर्मट पण सिध्द होत नाही.

ज्या दुकानात तुलनेने कमी वर्दळ असते तेथे चांगली सेवा मिळते. किंवा ज्यांच्याकडे जास्त सेवकवर्ग आहेत तिकडेही चांगली सेवा मिळते. पाणी आणुन देणे, चहा, कॉफ़ी, कधीकधी शीत पेये सुध्दा ... हे मी स्वतः अनुभवले आहे.

दार धरून ठेवणे, इथे इतके लोक ये जा करित असतात, तेव्हा एखाद्याने असे करायचेच म्हटले तर दिवसभर तो तिथेच उभा राहील ...

कमी वर्दळ असते तेथे लोक हा शिष्टाचार पाळतात असे पाहण्यात आले आहे.

आणि बऱ्याच ठिकाणी तर दारे सताड उघडे असतात. त्यामुळे धरुन ठेवण्याचा प्रश्न येत नाही.

राहीला प्रश्न, कागद उचलण्याचा. अहो इथे वाहतुक प्रश्न इतका बिकट झालय, आणि तुम्ही रस्त्यात कागद पाडुन मदतीची आपेक्षा करताय, कसे शक्य आहे?

जर पदपथावर असे काही घडले तर लोक नक्कीच मदत करतात.

उगाच नावे ठेवायची म्हणुन ठेवण्यात काय अर्थ आहे.

दुसरे असे की, पुणेकर उर्मठ बद्दल - तर अजुन एक प्रतिसादत म्हटलेच आहे की पुणेकर तिरकस बोलतो पण उर्मठ नाही. हे ही तितकेच खरे.

--(पुणेकर)  सचिन