या सर्वेक्षणाचे निकष अवैज्ञानिक आणि हास्यास्पद आहेत, याला एक विरंगुळा किंवा करमणूक यापेक्षा जास्त महत्त्व देऊ नये. पाश्चात्यांच्या चष्म्यातून स्वतःकडे पाहण्याची काही गरज नाही. त्यांच्या आणि आपल्या उर्मटपणाच्या/शालीनतेच्या कल्पना पूर्णपणे वेगळ्या आहेत
सहमत.
अर्थात आपण आहोत तसे सर्वगुणसंपन्न आहोत असे नाही. आपणांतही सुधारणेला वाव नक्कीच आहे, पण कुठल्या तरी पहाणीत अमुक असे आढळले म्हणून काही न्यूनगंड बाळगण्याचे कारण नाही.

बाकी या निमित्ताने पु. लं. च्या धर्तीवर 'तुम्हाला पुणेकर व्हायचे आहे का मुंबईकर' असा वाद रंगायला हरकत नाही!