त्या गावातील घरांना दारे नाहीत असे ऐकून आहे. बंद दारे उघडायची असतात आणि इतरांकरता धरुन ठेवायची असतात. सताड उघडी दारे जगात धरुन ठेवल्याचे ऐकिवात नाही.
अशा गावाचे सर्वेक्षण झाले आणि असाच बेशिस्तीचा/ उर्मटपणाचा मुद्दा जर शोधून काढला तर त्यांनाही तो लागू होऊ नये.
किंवा आमच्या घरांना दारेच नाहीत तेव्हा इतर ठिकाणी दारे धरुन ठेवण्याची पद्धत आम्हाला माहित नाही, ते आमच्या शिष्टाचारांत बसत नाही असे म्हणणेही योग्य आहे असे मला वाटत नाही.