या सर्वेक्षणाचे निकष अवैज्ञानिक आणि हास्यास्पद आहेत, याला एक विरंगुळा किंवा करमणूक यापेक्षा जास्त महत्त्व देऊ नये.

हे मत केवळ या (रीडर्स डायजेस्टच्या) सर्वेक्षणाबद्दल आहे.

पाश्चात्यांच्या चष्म्यातून स्वतःकडे पाहण्याची काही गरज नाही.

आत्मावलोकन/आत्मपरीक्षण करण्याची आपल्याकडे क्षमता आहे असे वाटते, त्यामुळे दुसऱ्यांच्या चष्म्यातून पाहण्याची गरज नाही. याचा अर्थ असा नाही की दुसऱ्यांची मते विचारात घेऊ नयेत.

मुंबईचे (आणि भारतच्या इतर शहरातील) सर्व लोक अगदी आदर्श आहेत असा भ्रम मला झालेला नाही. महान आणि आदर्श संस्कृतीचे वारसदार म्हणणवारे आपण सर्व पाश्चिमात्य देशांपेक्षा सामाजिकदृष्ट्या मागासलो आहोत असे खेदाने म्हणावे लागते. प्रामाणिकपणा, सामाजिक जाणीव आणि इतरांबद्दल आदर (फक्त आपल्या आप्तस्वकीयांबद्दल नाही) हे भारतीय लोकांत दुर्दैवाने दुर्मिळ झाले आहेत.