हा सर्व्हे पाश्चात्य चष्म्यातून असल्याने त्याकडे लगेच टीकाच केली पाहिजे असे काही नाही.उलट थोडे आत्मकेंद्रित होऊन पाहिले पाहिजे. उर्वरित सारे जग म्हणजे जणू काही भारताचे शत्रू आहेत आणि ते भारताला बदनाम करून महासत्ता होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहेत असा एक गंड समाजात पसरला आहे. पण एकदा `तिस-या पंचाच्या' नजरेने स्वत:कडे पाहुया ना...
बरोबर.या सर्वेक्षणाचा अर्थ काही सगळे जग मुंबईला वाळीत टाकायला निघाले आहे,ज्यांनी मुंबईची टिकिटे काढली होती ते ती परत करण्यासाठी पळत चालले आहेत किंवा मुंबई उद्धट ठरल्याने आता मुंबईकरांना काही कर भरायला लागणार आहे असा नव्हे. अशा सर्वेक्षणांनी स्वतःकडे पाहण्याची एक संधी मिळते एव्हढेच त्यांचे महत्व. उलट अशा या सर्वेक्षणांवर टीका करून आपण आपल्याकडे मुळीच सौजन्य नाही हे सिद्ध करीत आहोत असे नाही काय?
बाकी रीडर्स डायजेस्टने वापरलेल्या चाचण्या मलाही पसंत नाहीत.
शिवाय सौजन्यशीलता, शिस्तप्रियता, शिष्टाचार, इतरांना मदतप्रवृत्ती या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्यांची गल्लत होता कामा नये. या मासिकाने यापैकी नेमकी कोणती गोष्ट तपासली?
एक वात्रट