अमेरिकेचा न्युनगंड आजिबात नाही आणि नेसेसरी एव्हिल ही.

मी स्वतः अमेरिका आणि यु.के. मध्ये राहुन आलो आहे.  येणे जाणेही चालुच असते. त्यामुळे तशी आजिबात शक्यता नाही. (आणि अनेक मनोगती देखील सध्या आहेत, ये जा करत असतात. त्यांच्याबद्दल मला नक्कीच आदर आहे.)

(नोंद घ्यावीः फ़ुशारकी मारण्यासाठी हे लिहित नाही. तर भारतात बसुन लिहिल्यामुळे उगाच काही लोकांचा गैर समज होतो  की इथल्या लोकांना अमेरिकेचा न्युनगंड आहे. दुसरे असे की परदेशी जाणे आजकाल फ़ार काही मोठी गोष्ट राहीली नाही. असो)

माझा रोख हाच होता की परदेशी गेल्यावर जेवढ्या काटेकोर प्रकारे सगळे शिष्टाचार , नियम पाळणारे लोक आहेत, तेच लोक (सगळेच नाही, परंतु काहीअंशी तरी) इथे परत आल्यावर  कशा पध्दतीने वागतात? किती नियम शिष्टाचार पाळतात?

राहीला प्रश्न  "तिरकस टिप्पणीचा",  तर माझ्या पहिल्या प्रतिसादात कुठेही कोणावरही तिरकस टिप्पणी केली नाही. उलट मुंबईला अशा काही निकषांवर उर्मठ ठरवणे अयोग्य आहे हेच मांडले आहे.

चर्चा "मुंबई उर्मठ ठरवली गेली " त्याच्यावर असताना एकतर उगाच कारण नसताना पुण्याचे नाव घेतले गेले. त्याने माझे फ़ारसे काही बिघडत नाही.

परंतु मुळ मुद्यापासुन चर्चा भरकटली गेली.

वैयक्तिक टिप्पणीः- तर मी मुळीच केली नव्हती.  (हवे तर कृपया माझा पहीला प्रतिसाद पुन्हा वाचावा.)

असो,

--सचिन