श्री.विश्वासराव विवाहपूर्व संबंधाविषयी  मनोगतींची मते जाणून घेऊन कशाचा शोध घेणार आहेत यावर त्यानी प्रकाश टाकल्यास मत कोठल्या दृष्टीने द्यायचे हे कळू शकेल.आता श्री .भोमेकाकानी दाखवलेल्या दिशेने विचार केला आणि  विवाहपूर्व संबंध पुढे जे पतिपत्नी होणार आहेत त्यांच्यातच होणार असे गृहित धरले तर त्यासाठी विवाह ठरल्यानंतर प्रत्यक्ष पार पडण्यासाठी मध्ये पुरेसा वेळ असणे आवश्यक आहे‍.  झट मंगनी पट शादी अशी परिस्थिती असेल तर लग्नाची इतर तयारी करण्याऐवजी यातच वेळ घालवणे त्या भावी पतिपत्नी ना कितपत शक्य होईल शंकाच आहे.आता लग्न ठरून त्यानंतर प्रत्यक्ष लग्नाला बराच वेळ लागणार असेल तर ते शक्य आहे पण आवश्यक नाही .आणि तसा प्रयत्न त्या दोघानी केलाच तरी त्याची ते जाहिरात करत बसतील असे वाटत नाही की ज्यामुळे आपल्याला त्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करावी लागेल‌ समजा काही मनोगतींनी असे संबंध असले तर काही हरकत नाही (असे संबंध असावेतच असा आग्रह कोणी धरेल असे मलातरी वाटत नाही)असा अभिप्राय दिला तरी त्याचे ते समर्थन करतील असे वाटत नाही.त्यामुळे ते नसावेत असे म्हणणाऱ्यांचेच पारडे जड आहे असे दिसते,यावरून विश्वासरावांच्या शोधप्रबंधातून कुठले मौलिक सामाजिक सत्य बाहेर पडणार आहे याचा पत्ता लागत नाही. त्यावर त्यानीच प्रकाश टाकला तर आनंद होईल.