माझ्यामते वरील सर्वेक्षण हे आगंतुकांसाठी, पर्यटकांसाठी (देशी आणि परदेशी) अधिक महत्त्वाचे आहे. अनोळखी शहरात आपल्याशी कुणी हसून बोलले, प्रेमाने विचारपूस करीत पत्ता सांगितला तर बरेच वाटेल.
प्रियाली ह्यांनी दिलेल्या दुव्यावरील भूषण गगराणी आणि वीणा पाटील ह्यांची मते पटण्यासारखी आहेत. पर्यटन व्यवसायाशी संबंधित असल्यामुळे.
धंद्याच्या वेळी मुंबईकर अनोळखी माणसांशी सौजन्याने वागत नाही किंवा त्याला वेळ नसतो. अनोळखी माणसांनी पत्ता किंवा कुठलीही माहिती विचारलीच तर बहुतेकदा त्याच्या चेहऱ्यावर हा-माझा-टाइम-खोटी-करतो-आहे भाव असतो.
त्या मानाने आमच्या वऱ्हाडात लोक खूपच सौजन्याने वागतात, एखादा पत्ता विचारलाच तर त्या जागी पोचवूनही देतात.
आम्हाला आमच्यातील उणिवा पाश्चात्यांनी दाखवल्या म्हणून वाईट वाटणे साहजिक आहे. पण पाश्चात्यांचे अंधानुकरण होते आहे असे म्हणणे सोपे आणि स्वतःची समजूत घालायला बरे आहे. हेच निकष सिंगापूर, हनोई, कोलम्बो ह्या शहरांना लावले असावेत.
सर्वेक्षण करणारे भारतीयच होते निकष परदेशी होते असे कळते.