मुंबई उर्मट आहे की नाही माहित नाही. पण इथले प्रतिसाद वाचून खुप करमणूक झाली. कोंबडी चा प्रतिसाद सगळ्यात भावला. माझाही तिच्यासारखाच गोंधळ झाला. त्यातच प्रतिसादाची पाने आता ऊलटी दिसतात त्यामुळे मुळ प्रतिसाद वाचायच्या आधीच त्यावरील प्रतिसाद वाचुन गोंधळातल्या ग़ोंधळाची मजा लुटली.
एखाद्या साध्याश्या विषयावरील चर्चेचे अतिशय वेगात वैयक्तिक वादात रुपांतर होणे हि गोष्ट मनोगतींना नविन नाही. मला प्रश्न एवढाच पडतो की कोणी एखाद्या प्रांताबद्दल/भागाबद्दल काही बोलले तर आपण ती गोष्ट आपल्यावर लगेच का ओढून घेतो? आपल्या सगळ्यांची विनोदबुद्धी आपल्याला सोडुन गेलीय की फ़क्त आपण प्रतिसाद देताना ती जागी असते आणि इतरांचे प्रतिसाद वाचताना झोपी जाते??
"हलकेच घ्या" हे वाचून वाचून कंटाळा आला बघा अगदी. विनोदी लेखन ह्या साहित्यप्रकाराची मोठी परंपरा लाभलेल्या मराठी लोकांना मनोगतावर मात्र काय गंभीर घ्यायचे आणि काय हलकेच घ्यायचे हे कळतच नाही??
मनोगतींच्या अतितरल भावना लक्षात घेऊन उगाच फ़ट म्हणता ब्रम्हहत्या नको म्हणून मी ब-याच वेळा प्रतिसाद द्यायचे टाळले आहे. माझ्या प्रतिसादाने काहीच फ़रक पडत नाही पण माझ्यासारखाच विचार बरेच जण करत असतील तर त्यात नुकसान आपल्या सर्वान्चेच आहे.
साधना