ज्यावेळी एखादा पुरुष ....................... त्यावेळी या माणसांच्या जाणीवेवर इच्छेचा एवढा जबरदस्त पगडा असतो की स्त्रीचे मन तर सोडाच पण तिचे वास्तव स्वरूपही त्यांना दिसत नाही.
हया संपूर्ण परिच्छेदाचे प्रयोजन समजले नाही.
कामेच्छा फक्त पुरुषांना असते, स्त्रीला नाही? किंवा असली तरी तिला कामेच्छापूर्तीची गरज नाही. पुरुषांच्या कामेच्छा बळावल्याने त्याचे रुपांतर बलात्कारात होते. स्त्रीच्या कामेच्छा बळावल्याने कशात होते ते ही या "जाणकारांनी" सांगावे.
कुशाग्रांच्या मते परदेशातही बलात्कार होतात हे खरेच.
तेथे तर एकटी दुकटी स्त्री दिसली तर तिच्यावर बलात्कार करून तिला मारून टाकण्याचेच प्रयत्न होतात अशी एकादी तरी बातमी दररोज ऐकायला मिळते.
मग याचा आणि वेषभूषेचा संबंध काय?
पुरुषी वर्चस्वाच्या चुकीच्या कल्पना आणि कायद्यातल्या पळवाटाहेच कारण सर्वस्वी बरोबर आहे. खालच्या शरीरावर जे डोके आहे त्याचा उपयोग स्वतःला सावरण्यासाठी/ थांबवण्यासाठी (control) करण्यासाठी करता येतो हे जेव्हा माणसं विसरतात तेव्हा बलात्कार होतात.
लोक काय म्हणतील त्याला न जुमानता व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली अंगप्रदर्शन करणारे कपडे घालणारी स्त्री पुरुषांची अविचारी कृत्यांत परिणत होणारी अधीरता वाढवण्यास कारणीभूत होते ज्यामुळे (अंगप्रदर्शन न करणाऱ्या) इतर स्त्रियांवर बलात्कार होण्याची शक्यता वाढते.याचा अर्थ १००-२००-३०० वर्षांपूर्वी बलात्कार होत नव्हते असा होतो. मी तर पुराणकथांपासून बलात्काराच्या घटना वाचल्याचं आठवतयं. रांज्याच्या पाटलांचे हात पाय तोडले गेल्याचा इतिहासही लक्षात आहे.
स्त्री ही उपभोग्य वस्तू आहे असे समजणारे आणि त्यासाठी अशी हिणकस समर्थन देणारे तसेच स्त्रीला देवघरात ठेवू इच्छीणारे दोन्ही प्रकारचे पुरुष मला विकृतच वाटतात कारण एकिकडे तिला कमीपणा देऊन आणि दुसरीकडे तिला मोठेपणा देऊन ते ती केवळ आपल्या जोडिची आणि तोडीची माणूस आहे हे विसरत असतात.