मिलिंद,
सुरूवातीचा भाग वाचताना मिडास राजाची आठवण क्षणभर. अनिखिंडींनी कुपी दिली तेव्हा ती थोडासातरी खोलवर विचार केल्याशिवाय सतीश रचनाला देणार नाही असं वाटलं होतं. मनात शंकेची पाल चुकचुकली होती... सतीश आणि रचनाच्या खऱ्या प्रेमाची अजोड साक्ष पटली. कथेच्या शेवटाने मात्र सगळ्या भावनांना, आणि काहीशा स्वप्नवत् अशा मोहक जगाला तिलांजली देत कठोर अशा खरोखरच्या जगात परत यायला भाग पाडलं. कथा कशी वाटली हे सांगायला शब्दच उरवले नाही आहेत कथेच्या शेवटाने... संग्रही ठेवायला आवडेल आपली हरकत नसल्यास.