टगेरावांशी सहमत आहे...
बाकी झक्कासच जमलं आहे प्रकरण आता इतकी निखळ खिल्ली उडवायची म्हणजे आद्य खिल्लीकारांनी घालून दिलेली वाट चोखाळायला हवीच ना!
असामी असामी आणि बटाट्याच्या चाळीची छाप निश्चित्पणे जाणवली पण काय करणर शेवटी " पुरुषोत्तमाय नमः " हेच खरे ना...
सन्जोपराव, तुमचे निरीक्षण अप्रतिम आहे हो. विशेषतः 'त्या'चे. मला वाटले इथे पहा असे म्हणून तुम्ही विकी ची लिंक सुद्धा देणार....
गज़लांच्या विडंबनासारखी माणसांच्या विडंबनाची ही शैली मस्त आहे.
एकूणच खुसखुशीत आणि चकलीसारखे काटेदार झाले आहे. (आता लगेच एक शालजोडीतला मला येऊन लागायचा आणि हे काटे चकलीचे न होता साळिंदराचे व्हायचे.. नको रे नको देवा वाचव...
हघ्याहेसांनल!)
असो. लेखन आवडलं. या संमेलनातून आप-पर भाव लयाला जाऊन "प्रेमभावे मनोगत नटावे" अशी गडकऱ्यांच्या नाटकाच्या शेवटी शोभेलशी एक भाबडी आशा आहे.
आमेन!
--(आशावादी) अदिती