1) अपत्य असलेल्या मुलाशी कोण मुलगी लग्न करेल? त्यात त्या तान्ह्या मुलाचे भविष्याचा आणि नव्या नवरीच्या भविष्याचाही प्रश्न उद्भवतो. ताई आपण या जागी असत्या तर अशा मुलाशी लग्न केलं असतं का?
हो, मी मुलगी असतो तर आणि जर माझे त्या मुलाशी खरंच पटत असेल तर मी नक्की केले असते. (पटत असते याचा अर्थ आम्हा दोघांनाही एकमेकांच्या भूत आणि भविष्या बद्दल माहिती असती, जाणीव असती आणि परस्पर सामंजस्याने पुढील आयुष्य जगायची जिद्द असती तर!)
2) दुसरा मुद्दा महत्त्वाचा आहे. आपला समाज खरंच इतका पुढारलेला आहे का?
हो आहे
आणि समजा मुलीला अपत्य असते, तर मुलाने किंवा तिच्या घरच्यांनी तिचा स्वीकार केला असता का?
परत एकदा सांगावेसे वाटते की "कायद्याच्या चौकटीत राहून कोणी कोणाशी लग्न करावं हा ज्याचा/त्याचा, जिचा/तिचा वैयक्तिक प्रश्न आहे.." इति....तात्या
आणि त्यांच्या घरच्यांचाही आहे. जर एखादा मुलगा अथवा मुलगी लग्नानंतर लगेचच आपला जोडीदार गमावतो तर त्यात त्याची/तिची काय चूक?
वास्तवात या गोष्टी अभावाने घडतात. म्हणूनच आपण जरी 21 व्या शतकात असलो तरीही प्रत्यक्षात विचारसरणीने जुन्याच काळात वावरत आहोत. आपली संस्कृती अजूनही पुरूषप्रधान संस्कृती आहे. या बद्दल आपल्याला आणखी काही स्पष्टीकरण देणे आवश्यक नसावेसे वाटते.
असहमत/पटले नाही आणि पटेल असेल वाटतही नाही.
चिकू
या लिखाणात मला कोणा एका व्यक्तीला target करायचे नाहीये, कृपया कोणीही राग मानू नये.