कृपया श्रीरामाच्या जीवनातील सीतेची अग्निपरीक्षा किंवा वालीवध असे काही मुद्दे  घेऊन बसू नका.

 रामाला पुन्हा लग्न करता आले नसते का? पण त्याने केले नाही.  सीतेची रामाकडून  अग्निपरीक्षा आणि पुढे सीतात्याग यांचे कदापि समर्थन होऊ शकत नाही. काही अभ्यासकांच्या मते हा मागाहून घुसवलेला इतिहास आहे.  सीताहरणानंतर  त्याला  ब-याच स्त्रियांनी मोहित करण्याचा प्रयत्न केला. पण त्याने संयम सोडला नाही.

इथे रामाची एकपत्नीव्रती प्रतिमा महत्वाची आहे. त्याची केली जाणारी पूजा आणि समाजाची एकंदर  वागणूक यातील विरोधाभास खटकल्याशिवाय रहात नाही.

जे विवाहित आहेत अशांसाठी राम, विवाहित असून पत्नीपासून दूर आहेत अशांसाठी लक्ष्मण आणि अविवाहितांसाठी हनुमान ही आदर्श उदाहरणे आहेत. आणि अर्थातच स्त्रियांसाठी सीता आणि उर्मिला.

खरंतर या एडस कंट्रोल वाल्यांनी  या आदर्शांचा समाजाच्या कल्याणासाठी अभिमानाने उपयोग केला पाहिजे. त्यांची चारित्र्ये समाजमनावर बिंबवली पाहिजेत. पण नेमके याउलट समाजाने भोगी कसे बनावे , तरूणांनी योग्य (?) काळजी घेऊन अय्याशी कशी करावी याचे धडे ही मंडळी देत आहेत. याचे कारण स्वतःच्या संस्कृतीबद्दलचा प्रचंड न्यूनगंड. आज आफ्रिकेतील अनेक देश कंडोम नव्हे तर एकाच जोडीदाराशी निष्ठा राखा या मुद्यावर एडस चा प्रसार रोखत आहेत.

मूळ विषयापासून थोडा दूर गेलो पण याच्याशी संबंधित आहे म्हणून लिहिले.