आपण दोन विषय एकत्र देवुन त्यावर मते मागवताय असे वाटते.

१. मुलीने आपल्या मर्जी प्रमाणे लग्न करणे योग्य की अयोग्य?
- उत्तर : योग्य. कारण आयुष्य तिला काढायचे आहे. जोडीदार कोण असावा हे तिने ठरवणे योग्य.  (खरेतर लग्न करणाऱ्या प्रत्येकाने आपल्या मर्जीनेच लग्न करावे. असो)
आता, ती असा निर्णय घेऊ शकेल की नाही हे तिच्या घरात तिच्या मताला किती किंमत आहे यावर अवलंबून राहील.

२. ज्या मुलाला (व्यक्तिला) १ मुलगा आहे, त्याची पत्नी या जगात नाही. अशा मुलाशी लग्न करावे का?
उत्तर: अशा मुलाशी, म्हणजे नक्की काय? सरळ अर्थ घेतला तर एका बिजवराशी ज्याला १ मुलगा आहे, त्याच्याशी लग्न करावे का?  असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

यावर एक प्रश्न उभा रहतो की, मुलगी प्रथम वधू आहे की तीचे सुद्धा दुसरे लग्न हे आहे? आपल्या लेखनावरून असे वाटते (आणि मी गृहीत धरतो) की मुलगी प्रथम वधू आहे. (ती प्रथमवधू नसेल तर बरेच प्रश्न बाजुला पडतील)

सद्य स्थितीमध्ये, मुलाचा (त्या व्यक्तिचा) आणि त्याच्या लहान मुलाचा काही दोष नाही (असे मी गृहीत धरतो, नाहीतर पुढच्या लेखनाला अर्थच राहणार नाही ;-) ).

काही मुद्दे विचारत घ्यायला हवेत:
१. आपल्या भावी पतीला एक मुलगा आहे. त्याचा मी निखळ मनाने स्विकार करुन जीवन व्यतीत करू शकेन का? शिवाय त्या मुलालाही योग्य तो न्याय (प्रेम) देवू  शकेल का? याचा विचार मुलीने करायला हवा.
२. ती व्यक्ती आणि मुलीने एकमेकांशी संवाद साधला आहे का? पुढील आयुष्यात लहान मुलाव्यतीरीक्त बाकीच्या भूतकाळाला किती किंमत असणार? हे दोघांनी ठरवायला हवे.
३. दोघांच्या एकत्र येण्यामुळे आधीच्या लहान मुलावर कोणताही अन्याय तर होणार नाही ना?

अशा घटना क्वचित घडतात. एक बिजवर + एक प्रथम वधू.
जर हे दोघे एकमेकांना चांगले ओळखत असतील, आणि एकमेकांच्या सहवासाने त्यांच्यात प्रेम झाले असेल तर मग बरेचसे प्रश्न बाजुलाच राहतील (सुटतील) ... कारण "प्रेम आंधळ असतं" असे म्हणतात. एकदा प्रेम केले म्हटले तर मग "समोरचा जसा आहे तसा (सर्व गुणदोषांसकट) त्याचा स्विकार" येवढेच राहते. मग बाकीच्या गोष्टींचा उहापोह करण्यात अर्थ नाही.

योग्य त्या निर्णयासाठी शुभेच्छा!!

--सचिन