कथेचे पाच भाग काल एकत्र वाचले. कथा चांगली लिहीली आहे. वेगळे काही वाचल्याचे समाधान मिळाले. सतीशच्या दृष्टीने शेवट जरा करुण वाटला पण तोच एकमेव उपाय असावा. त्यामुळे चालेल. बाकी अशी टर्मिनेटर सीड किती विषारी आहे आणि तिच्या एका बॅचच्या वापरानंतर इतके भयानक परिणाम होतील की दुसरी बॅच आणि बियाणे वाली कंपनी हे दोन्ही बंद पडेल, असे असूनही कंपनीने ते बियाणे विकत घेण्याची सहमती का दाखवली असावी?