त्याबरोबरच सामाजिक विषयावर झाल्याने तोटा काय होणार आहे का?

मराठी भाषा, व्यवहार आदी विषयांवर अधिकाधिक चर्चा व्हाव्यात असे म्हणताना इतर विषयांवर चर्चा होऊच नयेत असे मी कुठेही म्हटलेले नाही.  आपण सोयीचा अर्थ काढत आहात.

मराठी भाषा वाढावी आणि मराठीतून व्यवहार वाढावा ह्यासाठी प्रामुख्याने ह्या संकेतस्थळाची निर्मिती झाली, असा माझा समज आहे.

चित्तरंजन भट

अवांतर
मराठीतून वाद घालणे सोपे आहे. हिंदू-मुसलमान संबंधांवर, फलजोतिषाच्या फोलपणावर रवंथ करणे कठीण नाही. पण मराठीतून विज्ञानविषयांवर, तंत्रविषयांवर लिखाण करणे हजार पट कठीण आहे. त्यावर अधिक लिखाण व्हायला हवे.