नंदन कथा दिल्याबद्दल धन्यवाद. कदाचित तुम्ही संपादित कथा वाचली असेल कारण मी वाचलेल्या मूळ कथेत दि. बा. मोकाशी एका पावसाळी दिवशी अस्वस्थ होऊन नविन कथाविषयाचा विचार करत असतात. त्याचवेळी गावाकडचा एक माणूस येतो. हा माणूस आल्यावर त्यांना नेहमी कथा सुचत असतात त्यादिवशीही तसंच होतं, कथेविषयी विचार करता करता पाऊस या गोष्टीचा विचार सुरू केल्यावर आपोआपच ही कथा मोकांशीसमोर उलगडते. पूर्ण कथाभर मोकाशींनी दोन वेगवेगळ्या पातळीवर कथा कशी घडली हे सांगितले आहे. एखाद्या लेखकाच्या डोळ्यासमोर कथा कशी उलगडते ते दाखविले आहे.
साती काळे.