लेख वाचला.  काही निरीक्षणे.

१. लेखिकेशी बोलताना काही लोकांनी केवळ हेटाळणीचा सूर लावलेला वाटला.  त्यातही जीभ सैल सोडल्यासारखे वाटले.  प्रश्न एका मराठी व्यक्तीने विचारले आहेत याची अजिबात जाणीव ठेवल्यासारखे वाटले नाही. 

२.  मुखर्जी, आणि होता यांची टीका मुद्याला धरून वा प्रामाणिक वाटली.  बाकीच्यांनी हवे तेवढे तोंडसुख घेतले आहे , काही बाबतींत "वड्याचे तेल वांग्यावर" काढले आहे असे वाटले.

३. उद्या हे सर्व दोष आपण काढले तर ही मंडळी आपल्याला "लेव्हल पे उठ -बैठने" देतील असे वाटत तरी नाही.

४. लेखिकेचा प्रयत्न प्रामाणिक व "मराठी" वाटतो.  इतर कोणत्या राज्यातील व्यक्तींनी हे असे प्रश्न स्वतःबद्दल विचारले असते असे वाटत नाही.  विशेषतः दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश येथील लोकांनी.  "इतरांच्या मताची पर्वा करणे" हे ही मराठी व्यक्तींचेच वैशिष्ट्य दिसते. 

 

 

इतरही बरेच लिहीण्यासारखे आहे, पण ते मागाहून सवड झाल्यावर लिहीन.

 

सुहासिनी