जन्ममृत्युच्या सिमारेषेवर हिंदकळत असतांना एक जीव काय अनुभवत असेल
लेख वाचल्यावर असे वाटतेय की आधिच मृत्यू झाला आहे आणि मग त्या
मृत व्यक्तिचे काय विचार(??) आहेत ते रेखाटले आहे... खालिल परिच्छेद तसे दर्शवित आहे असे वाटते (पंकज खुलासा करतीलच.)
अरे हे काय? आज सकाळ झाली तरी कोणीच कसे उठवायला आले नाही अजून ! एरवी या वेळेस धाकटा आप्पा किंवा मोठा नाना यापैकी कुणीतरी येतातच. आज कसे नाही आले कुणी? आणि डोळेही आज उघडत नाहीत कसे ते? हातपायही हालवता येत नाहीत. आज डॉक्टरला सांगायला हवं हे सगळं आणि हे काय मग हा गोंधळ कसला ऐकू येतोय. दुरून कुणीतरी रडत असल्यासारखा. म्हातारपणात काय काय सहन करावं लागतं.
तेव्हा जन्ममृत्यूच्या सीमेवर हिंदकळणारा जीव यात अभिप्रेत नसावा असे वाटते.
(चुभुद्दाघ्या)
--सचिन