अमितजी,

वारीच्या सांख्यिकीत तरूणांची संख्या वाढते आहे, या निरीक्षणाशी सहमत होणे जरा कठीण वाटते. पण वारी आणि तरूण असा विषय चर्चेसाठी घेतलाच आहे, तर काही चांगल्या गोष्टीही नजरेस आणाव्या वाटतात. एक म्हणजे वारीत गेली काही वर्षे सहभागी होणारी तरूणांची विज्ञानदिंडी, गेल्या वर्षीपासून सुरू झालेली, वृक्षारोपणाचा संदेश देणारी, चालता चालता वारकऱ्यांनी वाटेवर बिया टाकत जाण्याची अनोखी कल्पना (जिच्या यशापयशाबद्द्ल मलाच शंका वाटते, कारण भले बी टाकली तरी ती रुजली पाहिजे, रुजली तर तिथल्या गावकऱ्यांनी जोपासली पाहिजे) अशा काही गोष्टी जरूर सांगता येतील.

आणखी एक गोष्ट सांगायला हवी.  संतांनी किंवा सुधारकांनी वेगवेगळ्या परंपरा वा चळवळी रुजवल्या,तेव्हा ते संत वा सुधारक वयाने तरूणच होते.( ज्ञानेश्वर ज्यांनी मराठीचा पाया रचला, तुकाराम ज्यांनी त्यावर कळस चढवला  तेही त्या वेळी तरूणच होते. लोकमान्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली त्या वेळी तेही पंचविशीत होते.) तेव्हा तरूण म्हणजे बहकलेपणा किंवा बेरोजगारीचा प्रत्यक्ष अविष्कार एवढ्याच अर्थाने त्याकडे पाहिले जाऊ नये. संख्या खरोखरच वाढत असेल तर त्यातून चांगले काही घडेल अशी आशा करू या. सारांश, वारीत तरूणांची संख्या वाढते आहे आणि ती केवळ बेरोजगारीमुळे वाढते/ किंवा बेरोजगारीचा तो परिणाम आहे असे संपूर्णपणे म्हणता येणार नाही. पण वाढत्या बेरोजगारीचा  तो एक परिणाम आहे एवढे निश्चित.

वारीवरील चर्चेच्या निमित्ताने सहज आठवलं म्हणून लिहितो. वारीवर संशोधन करणारे व चित्रपट तयार करून जर्मनीत नेऊन दाखविणारे जर्मन संशोधक सायमन (की सोन्थायमर ) डी गुंथर हेही तरूण वयातच वारीकडे आकर्षित झाले होते.

एका चांगल्या विषयाबद्द्ल अमितजींचे अभिनंदन.

अवधूत.