कोण या मीनाताई ठाकरे? एका धर्मांध संघटनेच्या नेत्याची पत्नी यापलीकडे त्यांचे काय महत्त्व? त्यांची जिजाऊंशी तुलना करून लगेच त्यांना 'मांसाहेब' वगैरे म्हणण्याइतका त्यांनी काय कोणता शिवबा घडवला की काय? मुळात मुंबईत मोक्याच्या ठिकाणी पुतळा असावा असे त्यांनी काय केले?आणि त्यांच्या पुतळ्याच्या विटंबनेने सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचे नुकसान करण्याचा अधिकार शिवसेनेला कुणी दिला?
शिवसैनिकांच्या बुद्धीमत्तेविषयी मी आधीच साशंक आहे. आता तर त्यांच्या निर्बुद्धतेविषयी खात्रीच होत चालली आहे. संघटना संपत आल्यामुळे आणि कोणतेही राजकीय ( आणि त्यामुळे आर्थिक ) भवितव्य दिसत नसल्यामुळे आलेल्या वैफल्यातून हे प्रकार होत आहेत. हा सगळा बनाव शिवसेनेनेच स्वतःचे महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न म्हणून केला असावा, असे मानायला जागा आहे.
अशा उपद्रवी गोष्टींना कारणीभूत असणारे एकूणेक पुतळे समुद्रात बुडवले पाहिजेत असे माझे मत आहे. 'ओल्याबरोबर सुके' या न्यायाने गांधी, विवेकानंदांचे पुतळे बुडाले तरी चालतील. पण इथे कोण ऐकणार? इथे तर कोट्यवधी रुपये खर्च करून समुद्रातच पुतळे उभारण्याची योजना चालली आहे!
एकंदरीत असहाय, हतबल वाटावे अशा या घटना आहेत.