अशा उपद्रवी गोष्टींना कारणीभूत असणारे एकूणेक पुतळे समुद्रात बुडवले पाहिजेत असे माझे मत आहे.

१०० चा अनंतावा घात सहमत आहे.

नोकरी संभाळून इतकी मगजमारी करून मी तयारी केलेली कालच्या परीक्षेसाठी आणि नेमकं परीक्षेला निघायच्या वेळेस फोन,"कुठेही जाऊ नकोस बाहेर. दंगल झाली आहे.."
"दंगल.. दंगल.. दंगल.. विटलेय मी आता या सगळ्याला. समजून घ्यायच प्रयत्न कर गं.. माझा क्लास आहे आणि मुख्य म्हणजे परीक्षा आहे.. मी जातेय.."
"नंतर दे परीक्षा पण आज जाऊ नकोस बाहेर सांगून ठेवतेय.."
तिरीमिरीत मी क्लासमध्ये फोन केला तिथले हालहवाल विचारायला तर "क्लास बंद कर रहे है. बाहर नोटीस लगाई है की आज क्लास नहीं होगा और एक्झामभी पोस्टपोर्न की है !"
डोकं पाऽऽर भणाणलं माझं.काऽऽय फाल्तूगिरी आहे ही.. छ्या !!!