अनु,
  लेख छानच आहे. लवंगेच्या चित्राचा किस्सा छान आहे. पूर्वीच्या प्रतिसादात वाचला होताच, पुन्हा वाचताना मजा आली. तळटीपही छानच आहे.
 शेवटचा परिच्छेद छानच. परदेशातील स्वच्छता, शिस्त, भौतिक सुखसोयी अश्या काही गोष्टी डोळ्यात भरत असल्या तरी इकडील संस्कृती पाहिली कि, भारताची तीव्रतेने आठवण येते (भारतही बदलतोय म्हणा आता). बाजारात गेले कि, कोणतेही आजी/आजोबा असो, आमच्या मुलीशी खूप आपुलकीने/कौतुकाने बोलतात, सुरुवातीला याचे आश्चर्य वाटे. बाजारात गेले कि, अर्धा ते पाऊणतास अश्या आजीआजोबांशी बोलण्यातच जाई. पण हळूहळू लक्षात आले कि, त्यांची मुले/मुली/नातवंडे त्यांच्याजवळ नसतात, त्यामुळे हे लोक सगळ्याच लहान मुलांमध्ये त्यांना पाहून क्षणिक का होईना नातवंडांचे सुख मिळवतात.
 मायदेशातील गजबजाट आणि जिंवतपणाला मुकत आहोत, याचे दुःख वाटते,  "जननि जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसि!" हेच खरे.

श्रावणी