पुतळ्यासाठी हजारो लोकांना वेठीस धरणे हा प्रकारच भयंकर आहे. ज्याने विटंबना केली असेल तो हसत असेल. जी व्होल्वो जाळली त्या ट्रॅव्हल कंपनीने यांचे काय बिघडवले होते? हजारो लोकांना रखडवले त्यांनी यांचे काय वाकडे केले होते? शिवसेना मराठी आणि हिंदू लोकांचा कैवार घेते ना? मग ज्यांना त्रास झाला ते मराठी आणि हिंदू नव्हते काय?

यापुढे पुतळ्यांनाही झेड सुरक्षा द्यावी काय?

ज्या ज्या संघटनांचे वा पक्षांचे हे पुतळे आहेत  त्यांनी आपापले कार्यकर्ते २४ तास पुतळ्यांतेशी पहा-यावर ठेवावेत किंवा सरळ स्वखर्चाने कॅमेरे बसवावेत.  जमत नसेल तर पक्षाच्या कार्यालयात ठेवावेत.

जी काही थोडीफार सहानुभूती शिल्लक होती ती ही एका दिवसात सेनेने गमावली आहे. महापालिका निवडणुका जिंकणे कठीण आहे.