नक्की काय हवं आहे आपल्याला? तेच कळत नाही. इथली संपन्नता,स्वच्छता,प्रगतता की मायभूमीतील गजबजाट, जिवंतपणा आणि संस्कृती?
विचार करायला लावणारा प्रश्न!
संस्कृती म्हणजे.. हा पु. लं. चा उतारा आठवूनही आता त्यातलं हातात शिल्लक काय राहिलं आहे हाही एक प्रश्नच. केवळ एकत्र कुटुंबपद्धती, सोवळेओवळे, पूजाअर्चा, कर्मकांडे.. संस्कृतीमधलं जर एवढंच काळाच्या रेट्यात बाकी रहात असेल तर अशी संस्कृती हवी कशाला हा पण एक प्रश्नच. 'पाश्चिमात्य जगाला संस्कृती नाही त्यामुळे ते लोक प्रगत असले तरी सुखी नाहीत' असे (बहुदा भारतियांनी) काढलेले अनुमान तर्कावर आधारित की असूयेवर हासुद्धा एक प्रश्नच!
विचार करायला लावणारे लिखाण केल्याबद्दल आभार!
सन्जोप राव