पुतळ्याच्या विटंबनेने सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचे नुकसान करण्याचा अधिकार शिवसेनेला कुणी दिला?
तसं म्हटलं तर स्वतःच्या रक्षणासाठी उभारण्यात येणाऱ्या पोलीसठाण्याला विरोध करत दोन पोलीसांची हत्या करण्याचा अधिकार भिवंडीच्या लोकांना कोणी दिला .
आणि त्या नराधमांना एक लाखाची मदत देण्याचा आधिकार सरकारला कोणी दिला.
कोणा डॅनिश माणसाने काही वादग्रस्त चित्र काढ्ले तेंव्हा आझाद मैदानाच्या परिसरा काही लोकांनी जी तोड्फोड केली , सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचे नुकसान केले तेंव्हा सरकार / व्रुत्तपत्रे झोपली होती काय ?
त्या घटनेवर चर्चा करावी असे आपल्यापैकी कुणालाच का वाटू नये?
या सगळ्याच घटना घ्रुणास्पद आहेत , पण फक़्त शिवसेनेलाच का लक्ष करण्यात येते.....