बोंबला यांनी उपस्थित केलेला एकही मुद्दा शिवसेनेच्या वर्तनाचे समर्थन करत नाही. एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये अशी एक म्हण आहे. कोणताही हिंसाचार निंदनीयच, पण शिवसेना ज्या निर्लज्जपणे त्याचे समर्थन करते त्यामुळे ती अधिक धोकादायक ठरते. आणि हे काही शिवसेनेचे नवीन नाही. 'लोकशाहीपेक्षा ठोकशाहीवर आमचा विश्वास आहे' असे ज्या संघटनेचा नेता जाहीर सभेत मग्रूरपणे म्हणतो, स्वतःचा पक्ष सत्तेत असताना पु. ल. देशपांड्यांसारख्या पूजनीय व्यक्तीला आधी नाटकीपणे 'महाराष्ट्र भूषण ' जाहीर करतो आणि विकलांग अवस्थेतल्या पु̮. लं. नी आपली अस्वस्थता जाहीर करताच 'झक मारली आणि पु. लं. ना पुरस्कार दिला' असे मस्तवाल विधान करतो, जाहीर सभेत आपणच जागोजागी पेरलेल्या मुस्लीमांनी आपल्या समर्थनार्थ दिलेल्या घोषणा संपताच त्यांना व्यासपीठावर बोलावून त्यांची गळाभेट घेण्याचा बटबटीतपणा करतो..(किती उदाहरणे सांगावीत!)त्या संघटनेकडून दुसरी कसली अपेक्षा करणार? शिवसेनेने असाच मूर्खपणा सुरू ठेवावा म्हणजे ती संघटना लवकर संपेल अशी बाकी आशा करावीशी वाटते.