अनु
लेख छान आहे. मला वाटत तुझ्या प्रश्नातुन एक समस्या व्यक्त होते कि आमच्याकडे असे का नाही आणि तिकडे असे आहे तर हे का नाही? त्याचे कारण वा उत्तर म्हणु हवतर शोधायचा आपण जर थोडा जरी प्रयत्न केला तर जाणवत कि आमच्याकडे पुर्वी संस्कृतीच्या नावाने थोतांड माजवले त्याने आमचा सामाजिक विकास झालाच नाही. आज सुद्धा आम्ही आरक्षाणाचा मुद्दा चवीने चघळतो. पुढच्या पिढीचा विचर न करता मापल्या पुर्वीच्या काही पिढ्यांनी अमाप वाढवलेली लोकसंख्या, त्या लोकसंख्ये मधे असलेले फ़ारच थोडे असे चांगले मिळवण्यासाठी जीवघेणी स्पर्धा, मग त्यात आलेले अपयश अन पत्करलेला अयोग्य मार्ग. राजकिय स्वार्थ अन राजकिय उदासिनता, सामाजिक एकतेचा अविर्भाव आणि स्वार्थि प्रवृत्तीने समाजाला किड लगली आहे आणि त्यावर उपाय करायची कोणालाही इच्छा नाही. त्यामुळे सामाजिक विकास, समाजासाठी म्हणजेच आपल्यासाठी आपण आपल्यावर काही बंधने घालावीत ही इच्छा कोणामध्ये ही नाही.
उलटपक्षी, वर वर स्वयंकेद्रित दिसणारे पाश्चात्य लोक सामजिक जाण जास्त ठेउन आहेत निदान सोय अन सुविधे करिता तरी. पण त्या बरोबर भोगवाद सुद्धा आहेच. मी जेवढे निरिक्षण केले आहे त्यातुन हे लोक थोडे जागे होउन आपल्या दिशेने चालले आहेत आणि आपण मात्र भरकटत चाललो आहोत.
तुझ्यासारखे प्रश्न अनेकांना पडावेत आणि आशा सुद्धा असावी  हि मनोमन इच्छा आहे....

 

चाणक्य