कुठल्यातरी पेपरात शिवसैनिकांनी एक आलिशान व्हॉल्व्हो बस पेटवून दिल्याचे पाहिले आणि भयंकर संताप आला. कुण्या हलकटाने आपला वैयक्तिक सूड उगवायला हे केले असणार. त्या बसचा आणि पुतळ्याच्या विटंबनेचा काहीतरी संबंध आहे का? उगाचच कुणाच्यातरी मालमत्तेचा विध्वंस करणे हा हलकटपणा आहे. अशाने शिवसेना फार लोकप्रिय होणार आहेत का?
शिवसेनेने बंद पुकारला आणि महाराष्ट्रातील बहुसंख्य शहरे एक दिवस बंद पडली. कितीतरी लोकांचे नुकसान झाले असेल. एका क्षुद्र पुतळ्याकरता हे कशाला? जर खरोखरच कुणी अशी विटंबना केली असेल (मला राहून राहून हा शिवसेनेचाच बनाव वाटतो आहे) तर त्याला शोधून शिक्षा द्यावी. उगाच बाकीच्या लोकांना भुर्दंड कशाला?
असल्या मालमत्तेची नुकसानभरपाई शिवसेनेकडूनच घ्यावी असे मला वाटते.
शिवाजीच्या नावाला लाज आणत आहेत हे लोक. प्रजेकडून गवताची काडी घेतली तरी त्याची किंमत द्या असे सांगणारा शिवाजी कुठे आणि असला हैदोस घालणारे हे हलकट कुठे!
मुस्लिम लोक करतात म्हणून आम्हीही करणार असे म्हणणे हा नादानपणा आहे. मुंबईत (वा अन्यत्र) असल्या पक्षाला कुठेही सत्ता मिळू नये हीच इच्छा.