अवधूत,

तुमच्या विचारांबद्दल धन्यवाद.

माझे स्पष्टीकरणः

 माझा पहिला विचार हा लोकसत्तेतील एका लेखासंदर्भात होता. जो आषाढी निमित्त प्रकाशित झाला होता.

 मी स्वतः ह्याची शहानिशा केलेली नाही.

माझे असे म्हणणे होते की एका क्षणापुरते समजू या की खरेच तरूणांचा सहभाग वाढत आहे. तर ही काही चांगली गोष्ट नाही कारण असलेले काम सोडून कोणी वारीत येणार नाही. अपवाद असतात पण काही शेकडा किंवा हजारात नाही. त्या अर्थी ते बेरोजगारच असले पाहिजेत. शेती करत असणाऱ्यांकडे एवढे काम असते की त्यांना फुरसत नसते. व हे ही पटते सुशिक्षित बेरोजगार तरूणांना काम नसेल तर शेतात काम करायची लाज वाटते. हे तरूण जर वारीतील लोकांना सेवा पुरवत असतील तर तो भाग वेगळा. पण त्या साठी सुद्धा एवढ्या जणांची जरूरी नाही.

ज्ञानेश्वर व तुकाराम हे तरूण होते हे बरोबर पण त्या काळची सामाजिक परिस्थिती वेगळी होती. आज जग एवढे वेगाने जात आहे. एवढ्या तरूण हातांना काम नसेल तर चिंता करायची परिस्थिती आहे. व काम असून पण ते वारीत जात असतील तर ते कितपत बरोबर आहे?