कोण या मीनाताई ठाकरे?
याने नेमका काय फरक पडतो? हाच पुतळा शिवाजी महाराजांचा, गांधीजींचा, आंबेडकरांचा, कोणा पीराचा असला असता तर भावनाउद्रेक समजून घेण्यासारखा आहे काय?
एका धर्मांध संघटनेच्या नेत्याची पत्नी यापलीकडे त्यांचे काय महत्त्व?
हे काळे विश्लेषण अमान्य,... मासाहेबांचे स्वतःचे एक अस्तित्व आहे. सर्वांसाठी नसेल पण शिवसेनेसारख्या एका रात्रीत उभ्या न राहिलेल्या संघटनेतील अनेकांसाठी आहे.
त्याहूनही मोलाचे म्हणजे - अनेक ठिकाणी फारशा (की फारश्या?) ज्ञात नसलेल्या व्यक्तींचे पुतळे (उदा. दानशूर श्री. अबक यांच्या मातोश्री... ) त्यांच्याविषयीच्या सद्भावना व्यक्त करण्यासाठी उभे केलेले आहेत. त्या कोणत्याही व्यक्तीची विटंबना होणे योग्य नाही.
त्यांची जिजाऊंशी तुलना करून लगेच त्यांना 'मांसाहेब' वगैरे म्हणण्याइतका त्यांनी काय कोणता शिवबा घडवला की काय?
'मांसाहेब' म्हटले म्हणजे जिजाऊंशी लगेच तुलना करायला निघाले आहेत असा अतिरेकी त्रागाही नको.
मुळात मुंबईत मोक्याच्या ठिकाणी पुतळा असावा असे त्यांनी काय केले?आणि त्यांच्या पुतळ्याच्या विटंबनेने सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचे नुकसान करण्याचा अधिकार शिवसेनेला कुणी दिला?
हे दोन्ही प्रश्न महत्वाचे आहेत. मोक्याच्या ठिकाणी पुतळे नकोत ह्या भूमिकेस समर्थन! कोणालाही सार्वजनिक/खाजगी मालमत्तानुकसानीचा आणि जीवितहानीचा काहीही अधिकार नाही.
शिवसैनिकांच्या बुद्धीमत्तेविषयी मी आधीच साशंक आहे. आता तर त्यांच्या निर्बुद्धतेविषयी खात्रीच होत चालली आहे.
संघटना कोणत्या राजकीय पक्षाने शिवसेनेकडील बुद्धिमत्तेच्या खंदकाकडे बोट दाखवावे अशी परिस्थिती आहे तेव्हढे सांगावे म्हणजे थोडी तुलना करता येईल.
नकारात्मक उत्तर किंवा गाय-वासरू करण्याचा प्रयत्न नाही. कोणाच्याही गैरकृत्याचे अप्रत्यक्ष समर्थनही नाही.
पदव्यांच्या मालिकेवरून बुद्धिमत्ता मोजणारे आपण (संजोप राव) नाही असे येथील वावरावरून वाटते. तेंव्हा त्या कदाचित सोप्या ठरणाऱ्या हिशेबात शिरत नाही.
पण येथे उगाच हा तथाकथितच बुद्धिबळाचा टेंभा कशासाठी?
संघटना संपत आल्यामुळे आणि कोणतेही राजकीय ( आणि त्यामुळे आर्थिक ) भवितव्य दिसत नसल्यामुळे आलेल्या वैफल्यातून हे प्रकार होत आहेत. हा सगळा बनाव शिवसेनेनेच स्वतःचे महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न म्हणून केला असावा, असे मानायला जागा आहे.
वकिली थाटात मानायला जागा आहे असे उगाचच म्हणायला काय हरकत आहे! प्रत्यक्षात असा काही डाव असेल असे खरोखरच आपल्याला वाटते काय हे समजून घ्यायची उत्सुकता आहे. मला तरी इतका दरिद्रीपणा -- कल्पनेचा, कृतीचा, आणि आरोपांचाही -- असावा असे वाटत नाही.
अवांतर - आर. आर. पाटील यांनी सूचित केल्याप्रमाणे तपासणी बऱ्याच जणांना धक्कादायक असेल म्हणजे काय समजायचे?
(१) विरोधी पक्षांनी खरोखरच स्वतःच विटंबनेचा कट रचून हीन पातळी गाठली!
(२) सत्ताधारी पक्ष धूर्तपणे "विरोधी पक्षांनी स्वतःच विटंबनेचा कट रचला असे पुरावे आणि वातावरण" निर्माण करणार!!
(३) हे कृष्णकृत्य कोणी केले ह्याचा छडा कधीच लागणार नाही.
(४) हे कृत्य करणारे समाजकंटक सापडले.
(५) हे कृत्य हा एका मोठ्या कटाचा भाग आहे हे स्पष्ट झाले.
पाहू या काय काय बाहेर येते ते!
उपद्रवी गोष्टींना कारणीभूत असणारे एकूणेक पुतळे समुद्रात बुडवले पाहिजेत असे माझे मत आहे. 'ओल्याबरोबर सुके' या न्यायाने गांधी, विवेकानंदांचे पुतळे बुडाले तरी चालतील. पण इथे कोण ऐकणार? इथे तर कोट्यवधी रुपये खर्च करून समुद्रातच पुतळे उभारण्याची योजना चालली आहे!
दुहेरी प्रतिक्रिया -
(१) आपल्या भावनेशी सहमत. सुरुवात एखाद दुसऱ्या मासाहेबांच्या पुतळ्यापासून करायची की हजारो इतर पुतळ्यांपासून या वादातही न पडता अगदी १००% सहमत!!
(२) पुतळे उपद्रवी कसे? ही विटंबना करणारी आणि नंतर विध्वंस करणारी देखील माणसे उपद्रवी आहेत. सर्वच पुतळे काढून टाकावेत हे मान्य होणार नाही. हे म्हणजे सामना हरणार म्हणून खेळापासूनच पळ काढण्याचा प्रकार आहे.
काय म्हणून उखडणार आणि बुडविणार? मंदिरे/ध्वज/मानफलक/महत्वाच्या इमारती? विटंबना/विध्वंस ही विकृती आहे. गुन्हेगारांना कठोरात कठोर आणि तत्काळ धडा शिकविणारी यंत्रणा निर्माण करणे आणि राबविणे हाच तर चांगल्या शासनाचा दाखला आहे.
एकंदरीत असहाय, हतबल वाटावे अशा या घटना आहेत.
असेच काहीसे माझ्याही मनात... धीर सुटायला नको ही प्रार्थना...
मांसाहेब अमर होवोत - एकलव्य