ज्या भागात राहणाऱ्या जमावाने बसगाड्या जाळल्या त्या भागाकडे आणि भागाकडून इतरत्र जाणाऱ्या बसगाड्यांचे तिकीट वाढवले पाहिजे. दंगलीमध्ये, समाजकंटकांमुळे आजपर्यंत किती बसगाड्या जाळल्या गेल्या ह्याची नोंद ठेवली गेली असेल का? काही झालं की बसगाड्या जाळायच्या हा काय प्रकार आहे? बेस्ट (वा इतरत्र झालेल्या दंगलीत एस. टी.) शिवसेनेकडे वा भिवंडीतील रझा अकादमीकडे (वा इतर दंगलखोरांवर) अधिकृतरीत्या नुकसानभरपाई मागू शकते काय?