पुतळ्याच्या विटंबनेनंतर जे मुंबईत घडले ते निश्चितच दुःखद आहे आणि त्यावर योग्य कारवाई झालीच पाहिजे. ह्या घटने मागे काळेबेरे नक्की आहे पण त्यासाठी शिवसेनेलाच संपूर्ण दोषी धरणे मला योग्य वाटत नाही.
कित्येक वर्षे बाळासाहेबांनी फ़क्त मराठी लोकांसाठीच आवाज उठवला आहे. महाराष्ट्रात मराठीची सक्ती करावी लागावी हे आपले दुर्दैव, पण हे काम शिवसेनेनेच केले. मुंबईच्या ९३च्या स्फोटानंतर रस्त्यावर शिवसैनिकच मुसलमानां विरुद्ध उतरले होते. भिवंडीतील पोलिसांच्या निर्घृण हत्येनंतरही शिवसैनिकच रस्त्यावर आले होते.
गेल्या काही वर्षात शिवसेनेला जे ग्रहण लागले आहे ते खरेच दुर्दैवी आहे. पण बाळासाहेबांना धर्मांध म्हणणे अतिरेकी वाटते. अबु आझमी किंवा इतर मॉलवींसारखे बाळासाहेब फ़तवे तरी काढत नाहीत ना, ना ते बॉम्बस्फोटासारख्या समाजविघातक घटना घडवतात, ना ते कुठल्या अतिरेकी संघटनेला वाढिस लावतात.
पुलं ना बाळासाहेबांनी उलटंसुलटं बोलल्यावर मलाही वाईट वाटले पण हयाच बाळासाहेबांनी पुलंच्या पायावर डोके ठेउन माफी मागितली हे का विसरता. बाळासाहेब फटकळ आहेत पण धर्मांध वगेरे नाहीत, असलेच तर मराठी धर्माने अंध आहेत. आणि त्यासाठीच ते अजुनही हवे आहेत.
आयुष्यभर मुंबईवर प्रेम करणारा माणुस आणि मुंबईकर मराठी माणसांच्या सहकार्याने मोठा केलेला हा पक्ष असे काही करेल असे वाटत नाही.
अर्थात परवाच्या दोन्ही घटनांची योग्य चॉकशी होउन, अपराध्यांवर कारवाई व्हायलाच हवी.