कितीही सत्कृत्ये केली असली तरी पुढची अमकी दुष्कृत्ये माफ करावीत अशी अपेक्षा अगदी चुकीची आहे.
  काही दंगलीत आम्ही मुस्लिमांना धडा शिकवला म्हणून आता चार दोन बसा जाळल्या तरी काणाडोळा करा असे म्हणणे गैर आहे.  असे करणे अयोग्य आहे. 
   इन्दिरा गांधीने १९७१ चे युद्ध जिंकले म्हणून आणीबाणी लागू करून तमाम विरोधकांना तुरुंगात डांबणे दुर्लक्षणीय, निवडणुकीत गैरप्रकार करणे दुर्लक्षणीय असे म्हणण्यासारखे आहे.

  भारतात पूर, भूकंप होतात तेव्हा रास्वसंघ मदतीला जातो. असे अनेक वर्षे बघण्यात आले आहे. म्हणजे आता त्यांनाही काही भक्कम गुन्हे करायची परवानगी मिळाली नाही का?

अशी पुण्याची गंगाजळी जमवून त्याच्या बदल्यात पापे करायची सवलत घेणे हे मला पटत नाही.
   शिवसैनिकांनी जी बस जाळली ती भिवंडीत पोलिसांना मारणाऱ्या लोकांपैकी कुणाची होती का?