सर्वप्रथम स्वल्पविराम ,बंड्या आणि अमोल या सर्वांचंच मनापासुन अभिनन्दन आणि तुमच्या विचारांशी सहमत. एकतर मुंबईत ज्यांनी दंगल अनुभवली त्यांना नक्किच माहीती असेल शिवसेना कशी त्यांच्या मदतीला धाऊन आलेली. त्यावरुन मला एव्हढंच वाटतं कि मुंबईतले सर्वच हिन्दु प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे शिवसेनेमुळे वाचले आहेत. आणि पुन्हा वेळ पडली तर हेच तोड-फोड करणारे आपल्या मदतीला धाऊन येणार हे निश्चित आहे आणि हे चर्चा करणाऱ्यांना पुन्हा एकदा नवीन चर्चेची तयारी करत असणार.
आपल्या पैकी बरेच जण कुत्रा पाळतात, त्या कुत्र्याचा क्वचित त्रास आपल्यालाही होऊ शकतो पण वेळ पडल्यावर हाच कुत्रा चोरांवर चाल करुन आपल्या मदतीला येतो, शहाण्या माणसाने काय तो बोध घ्यावा.
इथे हे ही नमुद करतो की हे उदाहरण शिवसैनिंकाच्या विरोधात म्हटलं नसुन त्यांच्या समर्थनार्थ म्हटलं आहे. कदाचित हे उदाहरण तितकंस योग्य नसेल पण त्यामागची भुमिका ही शिवसेनेच्या समर्थनाचीच आहे.
जय महाराष्ट्र.