जमाव पोलिसांना नागडं करून दिवसाढवळ्या ठार करू शकतो तिथे दुसऱ्या जमावाने बस जाळली यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाहीये. या जमावांइतकाच हा भ्रष्टाचाराने पोखरून नपुंसक झालेल्या पोलिस यंत्रणेचाही दोष आहे.
प्रश्न हा आहे की निषेध आणि झालीच तर शिक्षा आधी खून करणाऱ्यांना करणार का बस जाळणाऱ्यांना. बरेच मनोगती आणि BBC यांच्यामते फक्त हिंदूच दंगे करतात. माझ्या मते आधी निषेध भिवंडीचाच झाला पाहिजे. सरकाराने जर पोलिसांच्या खुन्यांना शिक्षा केली तर निदान फौजदारी कायदा तरी सगळ्यांना समान लागू होतो असं दिसून येईल आणि हिंदूंचा असंतोष, जो अशा चुकीच्या पद्धतीने कधीकधी व्यक्त होतो, तो कमी होईल आणि आपोआपच अशा गोष्टीही कमी होतील