शिवसेनेने एका दिवसाकरता समस्त महाराष्ट्र बंद पाडला. मुस्लिम धर्मपिसाट नीचपणा करतातच पण त्यांच्याकडे महाराष्ट्र बंद पाडायची शक्ती नाही. भिवंडीत पोलिस ठाणे बनते आहे म्हणून त्यांनी भिवंडीत हैदोस घातला. पोलिसांना व सरकारला लाज असेल तर ते संबंधितांना कडक शिक्षा करतीलच. पण त्याहून (आजच्या घटकेला तरी ) जास्त शक्ती असणाऱ्या शिवसेनेने जास्त जबाबदारीने वागायला हवे होते. हातावर पोट असणाऱ्या लाखो लोकांना त्या यःकश्चित पुतळ्याच्या विटंबनेमुळे  उपासमार घडली आहे. अशा लोकांत हिंदू आणि मराठी लोकही आहेत. किंबहुना अशीच लोकं जास्त आहेत.

मला अजूनही असेच वाटते की शिवसेनेने स्वतःच हे कुभांड रचले आहे. तसे असेल तर हा आणखीच घृणास्पद प्रकार म्हटला पाहिजे.

भिवंडीत घडलेल्या प्रकाराचे हे प्रत्युत्तर आहे असे कुणाला म्हणायचे असेल तर कसे ते नीट समजावा.
शिवसेना ही हिंदूंची प्रतिनिधी नाही. एका घराण्यावर आधारित अशी ती एक संघटना आहे. सोयीचे असते तेव्हा हिंदुत्वाचा घोष करायचा, सोयीचे असेल तेव्हा मराठी तुतारी फुंकायची असे ह्यांचे धोरण असते.