शिवसैनिकांच्या वर्तनाचे समर्थन करणाऱ्यांची कीव करावीशी वाटते. विशेषतः एकलव्याचा प्रतिसाद वाचून धक्का बसला. अर्थात एकलव्याच्या राजकीय मतांविषयी फारशी माहिती नाही म्हणा.
घटना कोणतीही असो, त्याचा प्रतिसाद हिंसेने देणे हे कुणीही केले तरी समर्थनीय नाही. एका सामान्य व्यक्तीच्या पुतळ्याची विटंबना आणि सार्वजनिक मालमत्तेची नासधूस याचा काय संबंध? पण शिवसेनेला विरोधाचा तेवढा एकच मार्ग माहिती आहे. चौकाचौकातून गुटखा खाऊन थुंकत 'बंद कर, ए, मा****द, बंद कर...' अशा गर्जना (हा!) करत दुकाने बंद करत दहशत माजवणाऱ्या दाढ्याळ भगवट गुंडांच्या या वर्तनाला कोणता तर्क लागू होतो?
आणि मीनाताई ठाकरेंचे काय महत्त्व हा प्रश्न अनुत्तरितच आहे. तुमचा आदर वगैरे ठीक आहे, पण ठाकरे घराण्याशी आणि शिवसेनेशी इतक्या वर्षांचा संबंध सहन करण्यापलीकडे त्यांचे काय योगदान हे आमच्यासारख्या बहुसंख्य पूर्वगृहदूषीत लोकांच्या लक्षात येत नाही ना!
पदव्यांच्या मालिकेवरून बुद्धिमत्ता मोजणारे आपण (संजोप राव) नाही असे येथील वावरावरून वाटते. तेंव्हा त्या कदाचित सोप्या ठरणाऱ्या हिशेबात शिरत नाही.
पण येथे उगाच हा तथाकथितच बुद्धिबळाचा टेंभा कशासाठी?
याचा अर्थ आणि संदर्भ दोन्ही लक्षात आले नाही.
पुतळे उपद्रवी कसे? ही विटंबना करणारी आणि नंतर विध्वंस करणारी देखील माणसे उपद्रवी आहेत. सर्वच पुतळे काढून टाकावेत हे मान्य होणार नाही. हे म्हणजे सामना हरणार म्हणून खेळापासूनच पळ काढण्याचा प्रकार आहे.
सहमत. निर्जीव पुतळा उपद्रव पोचवत नाही, पण उपद्रवाला कारणीभूत तर होतो! बंदुकीची गोळी हिंसा घडवत नाही, ती झाडणारे हात घडवतात, त्या हातामागचा मेंदू घडवतो. तो मेंदू हिंसा घडवणाऱ्यांकडे नाही हाच तर खरा प्रश्न आहे.
गुन्हेगारांना कठोरात कठोर आणि तत्काळ धडा शिकविणारी यंत्रणा निर्माण करणे आणि राबविणे हाच तर चांगल्या शासनाचा दाखला आहे.
हे जर इतके साधे आणि सोपे आहे, तर सत्तेत असताना शिवसेनेने हे पटकन करून का टाकले नाही बुवा?
स्वल्पविराम लिहीतात,
पुलं ना बाळासाहेबांनी उलटंसुलटं बोलल्यावर मलाही वाईट वाटले पण हयाच बाळासाहेबांनी पुलंच्या पायावर डोके ठेउन माफी मागितली हे का विसरता. बाळासाहेब फटकळ आहेत पण धर्मांध वगेरे नाहीत, असलेच तर मराठी धर्माने अंध आहेत. आणि त्यासाठीच ते अजुनही हवे आहेत.
अहो, असा नाटकीपणा करणे हीच यांची खासियत आहे. उद्या कुणीही कुणाच्या थोबाडीत मारेल आणि मग लोकलज्जेस्तव त्यांच्या पायावर डोके ठेवेल. म्हणून मग आधीची थोबाडीत क्षम्य झाली का? आणि बाळासाहेब तुम्हाला हवे असतील तर तुमच्याजवळ राहू द्या ना त्यांना, इतरांना त्याचा त्रास का?
शिवसेनेने त्या दंगलीत मुसलमानांची अशी कत्तल केली, की आज पर्यंत नाशिक मध्ये परत मोठी दंगल झाली नाहीये... बाबरी मशीद प्रकारानंतर पण... भिवंडी पण बऱ्यापैकी शांत असायचं
वा..वा.. दंगल आणि कत्तल याचे इतके निर्लज्ज समर्थन वाचून अध्यात्मिक आनंद झाला. आपणासारखे विचारवंत शिवसेनेला भूषण आहेत. अशाच कत्तली करून शांतता प्रस्थापित करत रहा, म्हणजे कुणी सांगावे, एक दिवस, शांततेचे नोबेल पारितोषिकही मिळवाल!
आपल्या पैकी बरेच जण कुत्रा पाळतात, त्या कुत्र्याचा क्वचित त्रास आपल्यालाही होऊ शकतो पण वेळ पडल्यावर हाच कुत्रा चोरांवर चाल करुन आपल्या मदतीला येतो, शहाण्या माणसाने काय तो बोध घ्यावा.
विचारांशी नाही पण उदाहरणाशी सहमत.
आम्ही वाचलो शिवसेनेमुळे
आणि शिवसेना अजूनही थोडीफार वाचते आहे ती तुमच्यासारख्यांमुळे. यातले बरेवाईट काय, हे तुम्हीच ठरवा.