वा..वा.. दंगल आणि कत्तल याचे इतके निर्लज्ज समर्थन वाचून अध्यात्मिक आनंद झाला. आपणासारखे विचारवंत शिवसेनेला भूषण आहेत. अशाच कत्तली करून शांतता प्रस्थापित करत रहा, म्हणजे कुणी सांगावे, एक दिवस, शांततेचे नोबेल पारितोषिकही मिळवाल!
तुमच्याकडे दुसरा उपाय असल्यास सांगा... आहे त्याला दोष देणं सोपं आहे पण आपण आदर्श जगात राहतं नाही, त्यामुळे आपल्याला संरक्षणासाठी पर्याय आपल्यातल्यांचा खून झाल्यावर डरकाळीच्या ऐवजी मनातल्या मनात मॅव् करणारे पोलिस किंवा मोडकळीला आलेली गुंड शिवसेना यांतच आहे! आदर्शवादी वैगेरे होऊन दंगलीत हलाल किंवा निर्लज्ज होऊन शांततेत जिवंत यात मी काय निवडणार हे मला माहिती आहे आणि तुम्ही वेळ आल्यावर काय निवडणार हे देखिल...
शांततेचा मार्ग बरेचदा कत्तलीतून जातो हे इतिहास जागोजागी तुम्हाला दाखवून देईल. दुसऱ्या महायुद्धातला जपानने चालवलेला अमानुषपणा शेवटी अण्वस्त्रांच्या साहाय्याने अमेरिकेने केलेल्या अमानुष कत्तलीनेच थांबला...