अवं दादा तुमी कुटं व्हता तवा? मी म्हनतो बाकी कुनी न्हाई केला निषेध पन तुमासनी तरी कराया काय झाल्यालं?

बरोबर आहे तुमचे म्हणणे. पण अश्या विषयांवर आपापल्या दिवाणखान्यात बसून फावल्या वेळात* चर्चा करून किंवा प्रतिसाद देऊन काही साध्य होत नाही असे मला अलीकडे वाटू लागले आहे.

दोन घटनांना वेगवेगळा न्याय का असावा याचे मला आश्चर्य वाटले इतकेच. शिवाय शिवसेनेच्या गोंधळामुळे भिवंडीच्या गंभीर प्रकारापासून लोकांचे आणि मिडियाचे लक्ष इतरत्र गेले असो.

पन शेनेचा गोंधळबी अगदी काहीच न्हाई ह्ये काय पटत न्हाइ बगा राव!

कृपया ते वाक्य पुन्हा वाचावे

भिवंडीमधील घटना अतिशय भयंकर आहे, त्यामानाने शिवसेनेचा गोंधळ काहीच नाही.

* तुम्ही जरी खेडूत हे नाव घेतले असले आपण शहरात राहणारे पांढरपेशे असण्याची जास्त शक्यता आहे हे सांगण्यासाठी शेरलॉक होम्स ची गरज नाही. शिवाय फावल्या वेळात येऊन प्रतिसादही टाकत असता त्यामुळे सुखवस्तू घरातले आहात हेही समजू शकते त्यामुळे तुम्हीही "दिवाणखान्यात बसून फावल्या वेळात" या वर्गात येता असे मानण्यास हरकत नसावी.