शिवसेनेच्या आंदोलनामुळे कुणाला फायदा झाला? त्रास झाला ते हिंदू आणि मराठीच होते ना? शिवसेनेने यातून काय साधले? ज्यांची सहानुभूती होती ती ही गमावली. काल एका ९ वर्षाच्या जखमी मुलीचे छायाचित्र आले होते..ती या दगडफेकीत जखमी झाली. तिच्या वेदनांना जबाबदार कोण.? निर्जीव पुतळ्यासाठी आंदोलन करता? अरे. हाडामासाच्या जिवंत माणसांना का वेदना देताय? शिवसेनेने १९९२ च्या दंगलीत कवच दिले हे लक्षात आहे. पण रविवारच्या घटनेचे समर्थन होऊच शकत नाही. कदापि नाही.
भिवंडीच्या घटनेचा निषेध केलाच आहे. सर्वत्र होत आहे. हिरवे साप चेकाळले आहेत. पण ते करतात म्हणून आपणही दंगा करायचा याला काहीच अर्थ नाही.
आशा आहे की गृहमंत्री पाटील योग्य बंदोबस्त करतील आणि कडक धोरण स्वीकारतील. ते मला तरी अत्यंत प्रामाणिक गृहस्थ वाटतात.