चक्रपाणि, मोजक्या शब्दात अगदी उत्कटपणे लिहिले आहेस. माझ्या दोन्ही आज्यांची आठवण झाली. कालच 'हात एक तो हळू थरथरला, पाठीवर मायेने फिरला' ऐकताना प्रकर्षाने झाली होती. इकडून भारतात प्रथम गेल्यावर आजीच्या डोळ्यांत दाटलेला आनंद आणि वजन १०-१५ पौंडांनी वाढले असतानाही 'किती वाळलास!' म्हणून खंत करणे -- हे सारे आजीच करु जाणे.