शिवसेनेचा ऱ्हास होतो आहे हे खरे आहे. इथे अमोलने मांडलेली मते सुद्धा योग्य आहेत. पुतळ्यासाठी हिंसा योग्य नाही. याच इर्शेने महागाई वर दंगल करा पाहु?
मुद्दा असा आहे कि भारतीय समाजच नपुंसक होत चालला आहे. हेल्मेट सक्तीसाठी रस्त्यावर उतरणारे पुणेकर, खड्ड्यांच्या बाबतीत मात्र घरी बसुन चिंता व्यक्त करतात.
जर सगळेच पक्ष नालायक आहेत तर कोणाला पडली आहे का कि बाबा आपण पुढे होउन एकत्र होउन सरकारे बदलावीत आणि आपल्याला हवे तसे बदल घडवुन आणावेत. आम्ही मतदान करणार नाही. इथे येउन सगळे मात्र हिंदुसाठी कधी का होईना लढलेल्यांना संधी मिळताच शिव्या हासडणार...
देशातले नदीजोड प्रकल्प, रस्त्यांचे प्रकल्प रखडले तरी चालतील आम्ही मात्र ते प्रकल्प सुरु करणाऱ्यांना शिव्या घालणार. ते बासनात गुंडाळुन आरक्षाणाचे बाळकडु पाजुन एक नवीन विष तयार करणाऱ्या पक्षाला आणि त्या पक्षाच्या धन्य त्या जिजाऊला आपण आपली सुन बनवुन नवीन वंश सुरु करणार..
धन्य ती जनता.. धन्य ते नेते...