बातमी कळली आणि सुन्न झाले. काल आकाशवाणीच्या एका केंद्रावरून मुंबईकरांनी जखमींना केलेली मदत ऐकून मन भरून आले. मुंबईला माणुसकीचे शहर म्हणायला हवे. कसलीही ओळखपाळख नसताना जखमींना त्वरेने उचलून दवाखान्यात पोहोचवणे, जखमींच्या/मृतांच्या नातेवाईकांना कळवणे, जखमींना खाद्य/पाणी पुरविणे, जशी जशी जमेल तशी तशी मदत मुंबईकरांनी केलेली दिसत आहे, परंतु दुर्दैवाने पोलीसांनी मात्र बघ्याची भूमिका घेतल्याचे समजते.
नेहमीच मुंबई/मुंबईकरांवर कोसळणाऱ्या अश्या संकटांमधून ते लवकरच बाहेर पडावेत,अशी प्रार्थना.
श्रावणी