आपल्या समाजात स्त्री म्हणजे सती सावित्री आणि पुरुष अत्याचारी ही भावना सर्वत्र दिसून येते हे खरं आहे आणि समाजाचं हे मत स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही अन्यायाचं आहे.
तुमच्या ह्या कथेत प्राचीनं प्रशांतला खूपच मानसिक त्रास दिला, शिवाय त्याचे चारचौघांत धिंडवडे काढले हे चुकीचे आहेच, त्याबाबत दुमत नाही. पण प्राचीला काहीतरी मानसिक समस्या असावी असं ही कथा वाचून वाटतंय. प्रशांतच्या कामामुळं तो तिला तिच्या अपेक्षेप्रमाणे वेळ देऊ शकत नसावा, शिवाय आई-वडिलांना, मित्र-मैत्रिणींना सोडून इतक्या दूर तिला करमत ही नसावं, आपण दिवसभर घरी बसून असतो, आपलं शिक्षण आपण व्यर्थ घालवतोय ही भावनाही असावी असं वाटतंय. आणि त्यातून तिला depression किंवा तत्सम एखादा मानसिक आजार जडला असण्याची शक्यता आहे. ती लग्न करुन आली तेव्हा तिचा प्रशांतला फसवण्याचा कोणताही इरादा नव्हता. पहिले काही दिवस सुखाचेही गेले, पण नंतर आलेल्या एकटेपणामुळे सगळं बिनसलं असं मला तरी तुमची कथा वाचून वाटलं. ह्या बाबतीत एखाद्या मानसोपचारतज्ञाचा सल्ला घेणे बहुदा फायद्याचे ठरेल.
चू.भू.द्या.घ्या.
मैथिली