संजोपराव उगाच नसत्या गोष्टीला ताणताय कशाला? तात्यांनी त्यांच्या पहिल्या प्रतिसादापासूनच
कथामांडणी मात्र छान. कुठेही बोअर न होता भराभर पुढे जाणारी..

असा प्रतिसाद दिलेला असताना तुम्ही कथेवर चर्चा करायचं सोडून तात्यांच्या प्रतिसादाला विरोध करणे हा एककलमी कार्यक्रम राबवलेला दिसतोय.

अगदी प्रशांतच्या जागी मी असते तरी "सुटलो" असेच म्हणाले असते.

एकमेकांशी तारा न जुळल्याने नाईलाजाने विभक्त झालेले आणि नंतर आयुष्यभर जहरी होऊन राहिलेले लोक मी पाहिले आहेत,

खरं आहे , आणि आता लग्न झालेलंच आहे तर मोडल्यावर लोक काय म्हणतील याचा विचार करून आयुष्यभर एकमेकांसोबत जहरी आयुष्य जगणारे लोक आम्हीही पाहिलेत. किंवा मग सतत कोणीतरी एकच compramise करतंय आणि दुसरा मजा मारतोय हा प्रकारही पाहिलाय. पहिल्या लग्नात स्वतःची चूक कळल्यावर ते मोडून दुसरं लग्न करून सुखी झालेली मुलगीही जवळून पाहिल्येय.

अर्थात लगेच असा अर्थ काढू नका की मी धरसोड वृत्तीचं समर्थन करतेय पण लग्न या नात्यात जर सहजीवन उरलं नसेल तर संस्कृती म्हणून उगाच मन मारून एकत्र राहाण्यात काय फायदा?

त्यांना 'अरे रडता कशाला लेको, ब्याद गेली ना, मजा करा मस्त..' असे सांगण्याचे धाडस मला झालेले नाही.

हे काम आम्ही केलंय आणि एका मुलीच्या आयुष्यात सकारात्मक बदल झालेला अनुभवलंय.

                                                                साती काळे.